सोन्याचा डोंगर गोरक्षनाथांनी केला.
मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावांहून निघाले ते मार्ग क्रमीत तैलंगणांत गेले. तेथें त्यांनीं गोदेचे संगमीं स्नान करून श्रीशिवाचें पूजन केलें. पुढें आंवढयानागनाथ, परळीवैजनाथ आदिकरुन तीर्थे केल्यावर महारण्यांत गर्भागिरी पर्वतावर जे वाल्मीकिऋषीचें स्थान आहे, तेथें ते आले. तें अरण्य महाभयंकर, वाट देखील धड उमगेना; अशा त्या घोर अरण्यांतून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळें मच्छिंद्रनाथ भिऊन गेला. त्याचें कारण असें होते कीं, स्त्रीराज्यातून निघतांना त्यास मैनाकिनी राणीनें जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास न समजूं देतां त्याने झोळींत ठेविली होती. ती वीट चोर नेतील या धास्तीनें त्याच्या जिवांत-जीव नव्हता. ही सर्व भीति गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठींच होती, नाहीं तर मच्छिंद्रनाथास भीति कशाची असणार ! तो मार्गात चालत असतां गोरक्षास विचारी कीं, ह्या घोर अरण्यांत चोरांची धास्ती तर नाहीं ना ? हें ऐकून गुरुला चोराचें भय कशासाठीं असावें, ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनांत उत्पन्न झाली. गुरुजवळ कांहीं तरी वित्त असलें पाहिजे व तें चोर लुटून नेतील ही भीति त्यांना आहे, असा त्यानें तर्क केला व ते भय निरसन होण्याचा उपाय योजावा, असा मनांत विचार करून तो कांहीं उत्तर न देतां तसाच मुकाटयानें चालत होता. इतक्यांत त्यांस एक पाण्याचें ठिकाण लागलें तेथें मच्छिंद्रनाथानें गोरक्षास अंमळ थांबावयास सांगितलें व आपली झोळी त्याच्याजवळ देऊन तो शौचास गेला. तेव्हां गोरक्षनाथानें गुरुच्या झोळींत पाहिलें तों सोन्याची वीट दिसली. तेव्हां हेंच भीतीचें मूळ असें जाणून त्यानें ती वीट फेंकून देऊन तितक्याच वजनाचा एक दगड तींत भरुन ठेविला व आपण चालूं लागला. मच्छिंद्रनाथहि मागून तांतडीनें शौचाहून आल्यानंतर चालूं लागला. गोरक्ष बराच लांब गेल्यावर गुरु मागून येत होता. त्याची वाट पहात विसांवा घेत बसला, इतक्यांत एक विहीर त्याचे नजरेस पडली. तींत त्यानें स्नान केलें, मीननाथास स्नान घातलें व नित्यकर्म उरकून घेत आहे तो मच्छिंद्रनाथ जवळ आला आणि पूर्ववत् ’येथून पुढें कांहीं भय वगैरे नाहीं ना ?’ असें विचारुं लागला. त्यावर ’भय होतें तें मागें राहिलें, आतां काळजी न वाहतां स्वस्थ असावें’ असें गोरक्षनाथानें उत्तर दिलें.
अशा उडवाउडवीच्या गोष्टी जेव्हां गोरख सांगूं लागला तेव्हां मच्छिंद्रनाथ चकित झाला.मग त्यानें आपणांस वीट मिळाल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील, ही मोठी मला धास्ती आहे, म्हणून बोलला. तें ऐकून गोरक्ष म्हणाला, अशाश्वत वित्त आतां आपल्याजवळ नाहीं म्हणून भय देखील नाहीं ! हें ऐकून कांहीं तरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनांत उद्भवली व त्यास तळमळ लागली. तेव्हां गोरक्षानें मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभयतांनीं आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली. निघण्यापूर्वी झोळी तपासतां झोळींत वीट नाहीं असें पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलला व रडून त्यानें एकच गोंधळ केला. त्या दुःखानें तो गडबडां लोळूं लागला व मोठमोठयानें रडून पिशाच्चासारखा चौफेर फिरुं लागला. त्यानें गोरक्षास नाहीं नाहीं तें बोलून शेवटीं निघून जा. तोंड दाखवूं नको, इतकें सुद्धां सांगितलें.
मच्छिंद्रनाथाचे तें काळजास झोंबणारे शब्द ऐकून देखील गोरक्ष उगाच राहिला व त्याचा हात धरुन त्यास पर्वतशिखरावर घेऊन गेला. जातांना पर्वतावर गोरक्षानें सिद्धयोगमंत्र जपून लघवी केली. त्यामुळें तो सर्व पर्वत सुवर्णमय होऊन गेला. मग लागेल तितकें सुवर्ण नेण्यास त्यानें गुरुस विनंति केली. तें अघटित कृत्य पाहून त्यानें गोरक्षाची वाहवा करून त्यास शाबासकी दिली आणि त्यास आलिंगन देऊन पोटाशीं धरुन म्हटलें, बाळा गोरक्षा, तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन काय करुं ? अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथानें त्याची पुष्कळ वाखाणणी केली.
मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावांहून निघाले ते मार्ग क्रमीत तैलंगणांत गेले. तेथें त्यांनीं गोदेचे संगमीं स्नान करून श्रीशिवाचें पूजन केलें. पुढें आंवढयानागनाथ, परळीवैजनाथ आदिकरुन तीर्थे केल्यावर महारण्यांत गर्भागिरी पर्वतावर जे वाल्मीकिऋषीचें स्थान आहे, तेथें ते आले. तें अरण्य महाभयंकर, वाट देखील धड उमगेना; अशा त्या घोर अरण्यांतून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळें मच्छिंद्रनाथ भिऊन गेला. त्याचें कारण असें होते कीं, स्त्रीराज्यातून निघतांना त्यास मैनाकिनी राणीनें जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास न समजूं देतां त्याने झोळींत ठेविली होती. ती वीट चोर नेतील या धास्तीनें त्याच्या जिवांत-जीव नव्हता. ही सर्व भीति गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठींच होती, नाहीं तर मच्छिंद्रनाथास भीति कशाची असणार ! तो मार्गात चालत असतां गोरक्षास विचारी कीं, ह्या घोर अरण्यांत चोरांची धास्ती तर नाहीं ना ? हें ऐकून गुरुला चोराचें भय कशासाठीं असावें, ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनांत उत्पन्न झाली. गुरुजवळ कांहीं तरी वित्त असलें पाहिजे व तें चोर लुटून नेतील ही भीति त्यांना आहे, असा त्यानें तर्क केला व ते भय निरसन होण्याचा उपाय योजावा, असा मनांत विचार करून तो कांहीं उत्तर न देतां तसाच मुकाटयानें चालत होता. इतक्यांत त्यांस एक पाण्याचें ठिकाण लागलें तेथें मच्छिंद्रनाथानें गोरक्षास अंमळ थांबावयास सांगितलें व आपली झोळी त्याच्याजवळ देऊन तो शौचास गेला. तेव्हां गोरक्षनाथानें गुरुच्या झोळींत पाहिलें तों सोन्याची वीट दिसली. तेव्हां हेंच भीतीचें मूळ असें जाणून त्यानें ती वीट फेंकून देऊन तितक्याच वजनाचा एक दगड तींत भरुन ठेविला व आपण चालूं लागला. मच्छिंद्रनाथहि मागून तांतडीनें शौचाहून आल्यानंतर चालूं लागला. गोरक्ष बराच लांब गेल्यावर गुरु मागून येत होता. त्याची वाट पहात विसांवा घेत बसला, इतक्यांत एक विहीर त्याचे नजरेस पडली. तींत त्यानें स्नान केलें, मीननाथास स्नान घातलें व नित्यकर्म उरकून घेत आहे तो मच्छिंद्रनाथ जवळ आला आणि पूर्ववत् ’येथून पुढें कांहीं भय वगैरे नाहीं ना ?’ असें विचारुं लागला. त्यावर ’भय होतें तें मागें राहिलें, आतां काळजी न वाहतां स्वस्थ असावें’ असें गोरक्षनाथानें उत्तर दिलें.
अशा उडवाउडवीच्या गोष्टी जेव्हां गोरख सांगूं लागला तेव्हां मच्छिंद्रनाथ चकित झाला.मग त्यानें आपणांस वीट मिळाल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील, ही मोठी मला धास्ती आहे, म्हणून बोलला. तें ऐकून गोरक्ष म्हणाला, अशाश्वत वित्त आतां आपल्याजवळ नाहीं म्हणून भय देखील नाहीं ! हें ऐकून कांहीं तरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनांत उद्भवली व त्यास तळमळ लागली. तेव्हां गोरक्षानें मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभयतांनीं आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली. निघण्यापूर्वी झोळी तपासतां झोळींत वीट नाहीं असें पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलला व रडून त्यानें एकच गोंधळ केला. त्या दुःखानें तो गडबडां लोळूं लागला व मोठमोठयानें रडून पिशाच्चासारखा चौफेर फिरुं लागला. त्यानें गोरक्षास नाहीं नाहीं तें बोलून शेवटीं निघून जा. तोंड दाखवूं नको, इतकें सुद्धां सांगितलें.
मच्छिंद्रनाथाचे तें काळजास झोंबणारे शब्द ऐकून देखील गोरक्ष उगाच राहिला व त्याचा हात धरुन त्यास पर्वतशिखरावर घेऊन गेला. जातांना पर्वतावर गोरक्षानें सिद्धयोगमंत्र जपून लघवी केली. त्यामुळें तो सर्व पर्वत सुवर्णमय होऊन गेला. मग लागेल तितकें सुवर्ण नेण्यास त्यानें गुरुस विनंति केली. तें अघटित कृत्य पाहून त्यानें गोरक्षाची वाहवा करून त्यास शाबासकी दिली आणि त्यास आलिंगन देऊन पोटाशीं धरुन म्हटलें, बाळा गोरक्षा, तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन काय करुं ? अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथानें त्याची पुष्कळ वाखाणणी केली.
No comments:
Post a Comment